केंद्रातील मोदी सरकारच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात आणि चुकीच्या धोरणांविरोधात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून तिचा समारोप श्रीनगरमध्ये होणार आहे. सध्या ही यात्रा तामिळनाडू, केरळमार्गे कर्नाटकात पोहचली असून येत्या नऊ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये ही यात्रा पोहचणार असून त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.