अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
पेडणेकर म्हणाल्या, त्यांनी आज पत्र दिलं हे मी पहिल्या पत्राच्याबाबतीत म्हटलं होतं. पहिला मुद्दा समजला. दुसरा कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सगळ्यांना कळत आहे. भाजप आणि ईडीलामध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्र लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे, आपल्या हातून फाॅस्कोन जाऊन पाॅपकाॅर्न आला आहे असंही एक पत्र लिहा, असा टोला त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर लगावला आहे.
भाजप फक्त जांबोरी मैदान मिळवून सोहळे साजरे करू शकते. ते मैदान मिळवू शकतात. मैदान मारू शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली आहे.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी एकाच वेळी गोष्टी घडल्या. निवडणुकीतून माघार आणि ग्रामपंचायत निवडणुका. माघार म्हणात असाल तर कोल्हापूर ,पंढरपूर आणि देगलूर यांनी या ठिकाणी उमेदवार दिले होते. यातील एका ठिकाणी जिंकलात, दोन ठिकाणी हारलात, अशा शब्दात पेडणेकरांनी भाजपवर निशाणा साधला.