Friday, March 29, 2024

‘हनुमानाचा हा भक्त खोटं कसं बोलेल’; ‘सामना’तून शिवसेनेचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्र‘हनुमानाचा हा भक्त खोटं कसं बोलेल’; ‘सामना’तून शिवसेनेचा फडणवीसांना टोला

सत्तातरानंतर विरोधी पक्ष नेहमीच हे 50 खोक्याचं सरकार असल्याचं आरोप करत आहे. यातच आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांचा वाद निर्माण झाला.

वाद मिटला असं वाटत असतानाचं आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. याच वादावरुन विरोधी पक्षाने सामनातून जोरदार टिका केली आहे.

रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरे हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त अजिबात खोट बोलणार नाही. रवी राणा यांचा राम कोण? आणि बोलविता धनी कोण? हे बच्चू कडूंनां कळायला हवं होत.
हे जर समजलं असतं तर हे त्यांना कडू सत्य कळलं असंत, असा टोला बच्चू कडू आणि फडणवीसांना सामनातून लगावण्यात आला आहे.रवी राणा यांनी केलेलं वक्तव्य हे फडणवीस यांच्या मान्यतेनेच केलं असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles